टीम लय भारी
मुंबई : भाजपचे नेते असंवेदनशील आहेत. दोन आमदार आजारी असताना त्यांना दोन – दोन वेळा मतदानासाठी बोलवतात. भाजपची ही एक पद्धत आहे, अशी खोचक टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ होते. पण आमच्याकडून थोडी चूक झाली होती. आता विधानपरिषद निवडणुकीत मात्र ही चूक आम्ही सुधारली आहे. आमचे सगळे उमेदवार निवडून येणार आहेत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
आता आम्ही काळजी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. काँग्रेस व सहकारी पक्षांनी समन्वय साधला. हा विजय महाविकास आघाडीचा आहे, असेही थोरात म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
‘रामराजेंचे एक मत बाद झाले याचा आनंद’
भांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची
रवी राणांचे तुणतुणे सुरूच, ‘हाती कथलाचा वाळा, अन् मला सोनूबाई म्हणा’