टीम लय भारी
मुंबई: शिवसेनेतील घडामोडींशी भाजपचा संबंध नसल्याचे विधान आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
भाजपाने सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर केला नाही. भाजपा महत्वांच्या विषयांवर विचार करते. राज्याची कोअर कमिटी विचारविनीमय करते. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेेते. काल पत्रकार परिषदेत शरद पवारांनी शिवसेनच्या
दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप केला होता.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत नाही. अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळयाची स्थिती निर्माण झाली आहे.
हे सुद्धा वाचा:
मंत्री संदीपान भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही त्यांना ठाकरे सरकारकडून गिफ्ट