33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeनिवडणूकपाच राज्याच्या निवडणुकीनंतर भाजपचा डोळा आता महाराष्ट्रावर

पाच राज्याच्या निवडणुकीनंतर भाजपचा डोळा आता महाराष्ट्रावर

मुंबई :  लयभारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपावर यशाचा पाऊस पडला आहे. चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार स्थापन होणार हे तर जगजाहीर आहेच. गोव्यात तीन अपक्षांच्या मदतीने भाजपा सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. या विजयानंतर भाजप नेते व कार्यकर्त्यान मध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. “खरी लढाई तर मुंबईत होणार आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे”, त्याच बरोबर २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमतांनी निवडून येऊ असं आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजपाचे युद्ध पेटणार असल्याचं दिसून येत आहे.


गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे हिरो ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात धुमधड्याक्यात स्वागत करण्यात झाले, यावेळी कार्यकर्त्यांशी व माध्यमांशी सवांद साधताना फडणवीस म्हणाले, विजयाने हुरळून न जाता खरी लढाई मुंबईत होणार आहे. मुंबईत भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी