31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रनामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

टीम लय भारी

मुंबई : शुक्रवारी (दि. १५ जुलै २०२२) भाजप-शिंदे सरकारने महाविकास आघाडीकडून मंजूर केलेल्या नामांतराच्या प्रस्तावाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्यात जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले. परंतु याबाबतचा निर्णय पुन्हा एकदा या सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला ‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि उस्मानाबाद शहराला ‘धाराशिव’ असे नाव देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

याबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या तिन्ही गोष्टींना महाविकास आघाडी सरकारने आधीच मान्यता दिली आहे. परंतु राज्यात सत्ता नाट्य सुरु असताना, आणि महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेल्यानंतर या नामांतराला मान्यता देण्यात आली. म्हणून हे वैध नसल्याने भाजप-शिंदे सरकारने याबाबत पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आला.

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

यावेळी एमएमआरडीएला विविध विकासकामासाठी बँकेकडून ६० हजार कोटी कर्ज घेण्यात येणार असल्याचा निर्णय देखील मुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. या कर्जत पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेला शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्या आहेत.

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

हे सुद्धा वाचा :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी