टीम लय भारी
भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत- चीन सीमेवर चीननं सुमारे ६२४ गावं वसवल्याचं समोर येतंय. ही माहिती खुद चीन सरकारच्या सरकारी वेबसाईट ‘तिबेट डॉट सीएन‘ने सोशल मीडियावर प्रसारीत केली आहे. या अशा घटनांमुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Latest success in China’s high-altitude territorial revisionism: With Indians perennially distracted by domestic issues, including a never-ending election cycle, China has quietly completed the 624 villages that it set out to build in disputed or captured Himalayan border areas. pic.twitter.com/0o1ZhGa2Nf
— Brahma Chellaney (@Chellaney) March 21, 2022
गेल्या वर्षी सीमेवर चिनी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले होते.अमेरिकेच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, चीनकडून अरुणाचल प्रदेशाच्या भारतीय सीमेनजिक काही गावं उभारलेली आहे.
या गावांचा फायदा चीनला होणार आहे. ही गावं ज्या ठिकाणी वसवण्यात आली आहे तो अतिशय दुर्गम भाग आहे. चीनने या ६२४ गावांत वीज, पानी, पक्के रस्ते, मेडिकल सुविधा आणि रुग्णालये तसंच इंटरनेट ब्रॉडबॅन्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय. या प्रकरणावर सध्या भारताकडून कोणतीही प्रतिक्रया आलेली नाही.