टीम लय भारी
हॅमिल्टन : वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट पटू सलामीवीर स्मृती मानधनानं शतक झळकावलं आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ च्या महत्त्वपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ८ बाद ३१७ धावा केल्या.
महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. महिला विश्वचषकात ३०० पेक्षा अधिक धावा करणारा भारत जगात सहावा संघ ठरला असून, भारतापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी महिला विश्वचषकात ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या संघाने पाच वेळा, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघाने २ वेळा हा पराक्रम केला आहे.
India finish their 50 overs at 317/8, helped by two exquisite centuries by Smriti Mandhana and Harmanpreet Kaur 🙌
Can West Indies chase this mammoth total?#CWC22 pic.twitter.com/A0ao1wvpbS
— ICC (@ICC) March 12, 2022
याआधीची सर्वोच्च धावसंख्या ५० षटकात ६ बाद २८४ होती, जी ३१ जानेवारी २०१३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच केली होती. विशेष म्हणजे तेव्हाही भारतीय संघाचं नेतृत्व मिताली राजच्याच हाती होतं. भारताने हा सामना १०५ धावांनी जिंकला होता.
Today’s 184-run partnership between Smriti Mandhana and Harmanpreet Kaur against West Indies is the highest for India in Women’s World Cup history 👏#CWC22 pic.twitter.com/KWW1draVDp
— ICC (@ICC) March 12, 2022
या सामन्यात स्मृती मानधनाने ११९ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच वेळी, हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूंच्या खेळीत १० चौकार आणि २ षटकार ठोकत, १०९ धावा करून दमदार साथ दिली.