29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रिकेटऋषभ पंतचा 'अपयशाचा फेरा' संपेना !

ऋषभ पंतचा ‘अपयशाचा फेरा’ संपेना !

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा खराब फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर पंत एकदिवसीय मालिकेतही पूर्णपणे अपयशी ठरला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील शेवटच्या आणि तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंत फ्लॉप ठरला आणि अर्धवेळ गोलंदाज डॅरिल मिशेलने फक्त 10 धावा करून झेलबाद झाला. टीम इंडिया सातत्याने फॉर्मात नसलेल्या ऋषभ पंतला संधी देत ​​आहे. मात्र या संधीचा फायदा त्याला आतापर्यंत करता आलेला नाही.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा खराब फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर पंत एकदिवसीय मालिकेतही पूर्णपणे अपयशी ठरला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील शेवटच्या आणि तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंत फ्लॉप ठरला आणि अर्धवेळ गोलंदाज डॅरिल मिशेलने फक्त 10 धावा करून झेलबाद झाला. टीम इंडिया सातत्याने फॉर्मात नसलेल्या ऋषभ पंतला संधी देत ​​आहे. मात्र या संधीचा फायदा त्याला आतापर्यंत करता आलेला नाही.

पंत फलंदाजीत सतत फ्लॉप
क्राइस्टचर्च येथे खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात पंत आपला खराब फॉर्म मागे टाकून मोठी खेळी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. वास्तविक, 10 धावांच्या स्कोअरवर पंतने डॅरिल मिशेलचा चेंडू ओढण्याचा प्रयत्न केला. ज्यावर चेंडू त्याच्या बॅटशी नीट जोडू शकला नाही आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला.

हे सुद्धा वाचा

नवल : ‘इस्रायलमध्येही विकृत जितेंद्र आव्हाड !’

RBI लाँच करणार डिजिटल चलनाचा पायलट प्रोजेक्ट

भारतीय संघासमोर बांग्लादेश गारद !, पहिल्याच दिवशी जयस्वालची खेळी यशस्वी

पंतला संधीचा फायदा घेता आला नाही
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या ऋषभ पंतला भारतीय संघाने आणखी एक संधी दिली आहे. तिसऱ्या वनडेसाठी त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. पण या सामन्यातही तो बॅटने फ्लॉप ठरला. ऋषभ पंत बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याला संघातून बाहेर टाकून संजूला संधी देण्याबाबत चाहते सतत बोलत असतात. पंतच्या शेवटच्या सहा डावांवर नजर टाकली तर त्याने मागील सहा डावांत 6,3,6,11,15,10 धावा केल्या आहेत. 2022 मधील त्याची टी-20 कामगिरी पाहता त्याने यावर्षी 21 डावांत केवळ 21.21 च्या सरासरीने 364 धावा केल्या आहेत. पंतचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.

दरम्यान, आता ऋषभ पंतच्या सततच्या अपयशानंतर संघात संजू सॅमसन सारख्या प्रतिभावान खेळाडूला संधी का देत नाही असे शवाल सोशम मीडियाद्वारे बीसीसीआयला विचारले जात आहेत. अशा परिस्थितीत आता हा सामना सुरू असतानाच सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केलीा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी