अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पाॅर्न प्रकरणातून कधीच सुटका मिळाली आहे, परंतु कुंद्रा सध्या त्यांच्या ट्विटमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. साधारण वर्षभरानंतर राज कुंद्रा यांनी ट्वीट करून आपल्याला न्याय मिळेल आणि सत्य लवकरच बाहेर अशा प्रकारचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. पाॅर्न प्रकरणी नाव आल्याने अनेक जणांनी केवळ राज कुंद्रालाच नव्हे तर शिल्पा शेट्टीला सुद्धा ट्रोल केले होते. यावेळी पोस्टमध्ये सगळ्या हितचिंतकांचे आणि ट्रोलर्सचे सुद्धा आभार मानले आहेत. राज कुंद्रा यांचे हे ट्विट नेटकऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत असून या ट्विटर पोस्टमध्ये दिसणाऱ्या लुकची सर्वाधिक चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
उद्योगपती राज कुंद्रा यांनी साधारण वर्षभरानंतर आज ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ट्विटमध्ये राज कुंद्रा लिहितात, आर्थर रोड तुरुंगातून सुटून एक वर्ष झाले आहे. न्याय मिळेल. सत्य सुद्धा लवकरच बाहेर येईल असे कुंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. पुढे कुंद्र लिहितात, हितचिंतकांचे आभार आणि त्याहून अधिक धन्यवाद ट्रोलर्सचे ज्यांनी मला मजबूत केले असे म्हणून राज कुंद्रा यांनी पोस्टच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
हे सुद्धा वाचा…
India’s Loss to Australia: ‘आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही’ – रोहित शर्मा
Congress : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘दोन’ महत्त्वाचे नेते आघाडीवर
School Bus Fire : तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले 20 चिमुकल्यांचे प्राण
दरम्यान, या पोस्टमधील मजकुरापेक्षा पोस्टसोबत जोडलेल्या राज कुंद्रा यांच्या फोटोची सर्वाधिक चर्चा होत आहे. यामध्ये राज कुंद्रा यांनी मास्क, हुडी, कॅप आणि चष्मा अशा प्रकारच्या पेहरावात फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर तुम्हाला पूर्ण कहाणी माहीत नसेल तर शांत राहा असे म्हणून राज कुंद्राने ट्रोलर्सना दटावले आहे. या आधी सुद्धा लुकवरून राज कुंद्राने पोस्ट शेअर केल्या आहेत.
राज कुंद्रा जे मास्क घालतो, त्यावर नेटकऱ्यांकडून बरीच खिल्ली उडवली जाते. मास्क घालून जेव्हा जेव्हा राज कुंद्राचे फोटो समोर येतो तेव्हा तेव्हा नेटकरी खिल्ली उडवण्यासाठी तयार बसलेले असतात. राज कुंद्रा बाहेर पडताना अशा प्रकारचा का पेहराव करतो यावर नेटकऱ्यांमध्ये कायम उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. मास्क मधून सुद्धा समोरून जाणारी व्यक्ती राज कुंद्रा आहे हे अगदी सहजपणे ओळखू येत असल्याने त्याने घातलेल्या मास्कचा काय फायदा असा सुद्धा सवाल नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.
राज कुंद्र याने केलेल्या ट्विटमागे काहीतरी अर्थ दडल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे, त्यामुळे त्याच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे जात आहे हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…