29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआम्ही निवडणुकीत जिंकून येण्याची चिंता अजितदादांनी करू नये, गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

आम्ही निवडणुकीत जिंकून येण्याची चिंता अजितदादांनी करू नये, गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सभागृहातील दुसरा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि विरोधीपक्ष नेत्यांच्या भाषणाने दणाणून गेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या खेळीत प्रत्येकचजण मश्गूल असल्याचे दिसत आहे. यावेळी बोलताना शिवसेनेतील शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या सभागृहातील भाषणात उल्लेख करताना म्हटले, जे कोणी शिवसेना सोडून गेलेत त्यांना कोणी पुन्हा निवडून देत नाही, हे लक्षात ठेवावे. यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही निवडणुकीत जिंकून येण्याची चिंता अजितदादांनी करू नये असा मिश्कील टोला यावेळी त्यांनी लगावला.

भाषणात गुलाबराव पाटील म्हणाले, हिंदुत्वाची रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. आम्ही प्रेरीत होऊन शिवसेनेत प्रवेश केला. मला लोकांनी टपरीवाला म्हणून हिणवलं म्हणून दादा आम्ही शिवसेना सोडलेली नाही. हिंदुत्वाच्या विचारावर फारकत घेऊ नये म्हणून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असे म्हणून बंडखोर म्हणून हिणवणाऱ्यांना पाटील यांनी यावेळी चांगलेच खडसावले.

हे सुद्धा वाचा…

आमचं कुठे चुकलं? निधी वाटपावरुन अजित पवार कडाडले

एकनाथरावजी शिंदे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी! भास्कर जाधव कडाडले

माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी