29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यगर्भसंस्कारामुळे जन्मणाऱ्या बाळाला खरोखरच फायदा होतो का?

गर्भसंस्कारामुळे जन्मणाऱ्या बाळाला खरोखरच फायदा होतो का?

गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान प्राचीन धर्मग्रंथ आणि आयुर्वेदामध्ये आहार, योगासने आणि गर्भवती महिलेच्या शरीराची नियमित काळजी घेण्यासोबतच साहित्य वाचन आणि संगीत ऐकण्याच्या सूचनाही आहेत आणि यालाच गर्भसंस्कार (Garbh Sanskar) म्हणतात. तर याचा खरंच फायदा होतो का? गर्भसंस्काराचे वर्ग कोण घेतात? तज्ञांचे म्हणणे काय? याचा काही वैज्ञानिक पुरावा आहे काय? हे आपण आज या लेखात पाहुयात..

महाभारत सारख्या प्राचीन धार्मिक ग्रंथातून गर्भसंस्काराचा संकेत देण्यात आला आहे. जिथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूला त्याच्या आईच्या उदरातून चक्रव्यूहबद्दल माहिती मिळाली. आणि पुराणांमध्ये प्रल्हाद, राक्षस राजा हिरण्यकश्यपूपासून जन्माला येऊनही, भगवान विष्णूची पूजा करतो कारण त्याने गर्भात असताना त्याचे नाव ऐकले होते. गर्भसंस्कार गर्भधारणेदरम्यान जीवनशैलीत बदल सुचवतो, असा दावा करतो की, यामुळे बाळाला निरोगी आणि बुद्धिमान बनण्यास मदत होते.

गर्भ महिलेसाठी भरणाऱ्या गर्भसंस्काराच्या वर्गांमध्ये एकूण 16 संस्कारांचा समावेश होतो. वेदांमधील प्राचीन ज्ञानापासून उद्भवलेले, ज्याचे उद्दिष्ट गर्भातील मुलाचा सर्वांगीण विकास करणे आहे. गर्भधारणेच्या वेळेपासूनच हे वर्ग सुरू होतात, असे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ. कमलेश मिश्रा आणि नोएडा येथील आयआयएएस स्कूल ऑफ योग येथील गर्भ संस्कार शिक्षणतज्ञांनी स्पष्ट केले आहे. (pregnancy rite)

गर्भधारणेवेळी या वर्गांत शांत संगीत ऐकणे, ध्यान करणे, सकारात्मक विचार करणे, सर्जनशील कार्य करणे आणि शारीरिकरित्या सक्रिय राहण्याची शिफारस केली जाते. त्याचप्रमाणे आहाराच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आणि अर्थपूर्ण गोष्टी म्हणणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः वीणा, बासरीचे मधुर सूर मुलासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण ते केवळ बाळाच्या मेंदूच्या विकासाला गती देण्यास मदत करत नाहीत तर मनावर सकारात्मक परिणाम देखील करतात. त्याचे इतर फायदे म्हणजे “बाळाला चांगली झोप येते आणि स्तनपान करताना चांगला प्रतिसाद मिळतो,” असा दावा डॉ. मिश्रा यांनी केला आहे. त्यासुध्दा आठवड्यातून 5 दिवस ऑफलाइन आणि ऑनलाइन असे गर्भसंस्काराचे वर्ग घेतात.

गर्भसंस्कार वर्ग कोण घेतात?
योग आणि आयुर्वेद शिकवणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्था असे वर्ग आयोजित करतात. यावर अनेक गुगल पर्याय देखील दिसून येतात. अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संलग्न संवर्धिनी न्यासने गर्भवती महिलांना ‘संस्कृती आणि मूल्ये’ शिकवण्यासाठी मोहीम हाती घेतली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्त्रीरोग तज्ञ, आयुर्वेदिक डॉक्टर आणि योग प्रशिक्षक 1,000 महिलांपर्यंत पोहोचण्याची योजना आखत आहेत.

याबाबत संवर्धिनी न्यासच्या राष्ट्रीय संघटक सचिव माधुरी मराठे म्हणतात की, गर्भात असलेल्या बाळाला “सांस्कृतिक मूल्ये” द्यायची कल्पना आहे. जी बाळाला देशाचे प्राधान्य सांगते. पुढे माधुरी सांगतात की, मराठा नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनीही आपल्या गरोदरपणात अशीच प्रार्थना केली होती की, त्यांनी एका महान व्यक्तीला जन्म द्यावा. “शारीरिक आरोग्य हे नक्कीच महत्वाचे आहे, परंतु गर्भाची शुद्धी भगवद्गीता सारख्या शास्त्राचा जप करून, शक्य तितक्या लवकरात लवकर होते.” माधुरी यांनी स्पष्ट केले. असे गर्भवर्ग मुलांमध्ये दया, प्रेम आणि करुणासारखे गुण विकसित करण्यास मदत करतात आणि सध्याच्या तणाव आणि नकारात्मक प्रभावांच्या काळात हे खूप उपयुक्त ठरू शकतात, असे गर्भसंस्कार आणि पालकत्व प्रशिक्षक अर्पिता अग्रवाल यांनी संगितले. अग्रवाल यांनी 2019 मध्ये ‘भारत संस्कारों की जननी’ ची स्थापना केली होती. एक असे व्यासपीठ जे गरोदरपणाच्या वेगवेगळ्या त्रैमासिकांसाठी क्रमाक्रमाने जीवनशैली बदल मार्गदर्शक देते.

तज्ञ अशा वर्गांची शिफारस करतात का?
आम्ही रुग्णांना त्यांच्या विचारांची शक्ती ओळखण्यासाठी मार्गदर्शन करतो आणि त्यांनी भगवद्गीता आणि रामायण वाचण्याची शिफारस करतो. तसेच, मातांना भावपूर्ण, चांगले संगीत ऐकण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, असे नवी दिल्ली येथील मदर्स लॅप IVF सेंटरच्या वैद्यकीय संचालक आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गर्भसंस्काराच्या वेळी तसेच आधी गर्भसंस्काराची शिफारस देखील त्यांनी केली आहे. क्लाउड नाइन हॉस्पिटल्सच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती राय म्हणतात की, “गर्भ संस्कार, सोप्या भाषेत, तुमच्या गर्भात न जन्मलेल्या मुलाला शिक्षित करणे. मी अपेक्षा करणार्‍या मातांना याची शिफारस करतो कारण ते एक नातं निर्माण करण्यात मदत करते आणि खूप सकारात्मकता देते.”

याबाबत काही वैज्ञानिक पुरावा आहे का?
इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. आरव्ही वेंकटेश्वरन सांगतात की, भारतात गर्भवती महिलांना मधुर गाणी, विशेषत: भक्तीपर गाणी ऐकण्यासाठी, स्वतःला चांगले ठेवण्यासाठी आणि भयपट किंवा हिंसक चित्रपट न पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे. या मागचा हेतू असा की, साधारण पाचव्या महिन्यापासून बाळ आईचे आवाज ऐकते ती काय म्हणते यावर प्रतिक्रिया देते. यासाठी काही शास्त्रीय आधार आहे का, हे सांगणे खरच कठीण आहे. परंतु, हे आईला चांगले वृत्ती ठेवण्यास मदत करते आणि हा विश्वास आहे, असे डॉ. वेंकटेश्वरन यांनी स्पष्ट केले.

नोएडा येथील मदरहूड हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजू गुप्ता म्हणतात की, चांगले विचार, मधुर संगीत, निरोगी आहार, झोप आणि चांगले वातावरण यामुळे बाळ निरोगी होऊ शकते, अशी अनेक स्त्रीरोग तज्ञांनी शिफारस केली आहे. विशेषतः आतापर्यंत गर्भसंस्काराला कोणताही शास्त्रीय आधार नाही. परंतु हे सिद्ध झाले आहे, की बाळ आईच्या आवाजावर प्रतिक्रिया देते आणि हेच बाळ निरोगी असल्याचे सूचित करते. हे नातं आई आणि बाळाच्या विकासासाठी चांगले मानले जाते, असेही डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा:

अनवॉन्टेड प्रेग्नंसी टाळण्यासाठीचा सर्वात आरोग्यदायी उपाय जाणून घ्या

Good Health : निरामय आरोग्यासाठी ‘लिंबू’ खाणे हितकारक

Health tips : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 7 गोष्टी नियमित खा! वाचा सविस्तर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी