टीम लय भारी
मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी घर विकण्याच्या संदर्भात महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. घर मालकाला विकायचा किंवा भाड्याने द्यायचा असेल, तर आता सोसायटीच्या ना हरकत (NOC) प्रमाणपत्रची आवश्यकता नाही. या अटीमुळे वाद होत आहेत, असल्याची बाब गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी ट्विटरच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली आहे.
If the owner wants to rent his flat or sell his flat he needs no NOC from the society…
This is increasing hatred— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 11, 2022
विशिष्ट धर्माच्या लोकांना मुंबईत घर नाकरण्यात आली असे अनेक प्रकार समोर आले होते. काही शहरातील सोसायट्या जात, पंथ, धर्म आणि समुदायाच्या आधारे भेदभाव करत, त्या अनुषंगानेच सदनिका मालकाला विकण्याची किंवा भाड्याने देण्याची परवानगी देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
विशिष्ट समुदायाचे वर्चस्व असलेल्या भागात, फक्त अशाच लोकांना सदनिका खरेदी करण्याची परवानगी दिली जात आहे. इतर काही भागात अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीय सदस्यांना सदनिका विकणे किंवा भाड्याने देणे प्रतिबंधित केले आहे, यामुळे द्वेष वाढत आहे.
हे सुध्दा वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात मूक निदर्शने, महाराष्ट्र अराजक सहन करणार नाही :जितेंद्र आव्हाड
No NOC from housing society is needed to sell or rent flat in Mumbai, says Minister Jitendra Awhad
पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष!