टीम लय भारी
मुंबई: राज्यासह देशातही भोंग्यांवरील राजकारण तापलेले आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे.
योगींच्या या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं अभिनंदन केलं होतं. तसेच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. jitendra awhad criticism raj thackeray
जितेंद्र आव्हाड यांची टीका
कोणी योगी आहे
कोणी भोगी आहे
तर कुणी मानसिक रोगी आहे pic.twitter.com/cPcacvoiZJ— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2022
याचं टीकेला उत्तर देत आमदार जितेंद्र आव्हाड( jitendra awhad )यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात की, ‘कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे’. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे आणि अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत असं म्हटलं की, “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.
ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !#Maharashtra #thursdayvibes
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 28, 2022
हे सुद्धा वाचा:
डॉ. जितेंद्र आव्हाडांच्या पुढाकाराने सोनू निगमचा ठाण्यात जलसा
India’s Chip Making Dream: PM Modi Inaugurates SemiconIndia Conference 2022 In Bengaluru