टीम लय भारी
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी ट्विटरवर एक शायरी पोस्ट केली आहे. यातून त्यांनी मनसेला टोमणा मारला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांवरुन वातावरण तापले आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्द्यावरून मनसेने आणि राज्य सरकारमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. Jitendra awhad criticized raj Thackeray with shayari
दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है उम्र भर का गम हमे ईनाम दिया है तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है ….. मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया
दुश्मन ना करे दोस्त ने
वो काम किया है
उम्र भर का गम
हमे ईनाम दिया हैतूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये
तूफाँ में हमको छोड़ के
साहिल पे आ गये.दुश्मन न करे दोस्त ने
वो काम किया है
…..
मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्या नंतरची नैसर्गिक प्रतिक्रिया— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 5, 2022
या राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. जगात बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भोंग्यांच्या विषय काढण्यात आला आहे. कितीही केले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांसारखे होऊ शकत नाही, असंही जितेंद आव्हाड म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हे सुद्धा वाचा:
भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का?- जितेंद्र आव्हाडांची खोचक टिका