31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रप्रतिविधानसभेवर भास्कर जाधवांचा आक्षेप; त्यांचे माईक जप्त करा

प्रतिविधानसभेवर भास्कर जाधवांचा आक्षेप; त्यांचे माईक जप्त करा

टीम लय भारी

मुंबई :- विधिमंडळाच्या दुसऱ्या आणि अंतिम अधिवेशनाच्या कामकाजावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. यानंतर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवली आहे. प्रतिविधानसभेसाठी अध्यक्षांची परवानगी घेतली का ते पाहा, नसेल तर संबंधितांवर कारवाई करा, तसेच त्यांचे माईक जप्त करा असे भास्कर जाधव म्हणाले आहेत (Bhaskar Jadhav has said seize the mic).

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवली आहे. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत ते म्हणाले, विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे. तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे. परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचे आंदोलन करणे यासाठी अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसेच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली (Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal).

“केलं तुका झालं माका” संजय राऊत यांचा भाजपला टोला

नारायण राणे तातडीने दिल्लीत रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी घेतला.

Bhaskar Jadhav has said seize the mic
भाजपची प्रतिविधानसभा

आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबन केले; देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly: 12 BJP MLAs suspended for 1 year for ‘misbehaving’ with presiding officer

Bhaskar Jadhav has said seize the mic
भाजपची प्रतिविधानसभा

विधानसभेत किंवा विधान परिषदेत न जाता विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसूनच भाजपने प्रति विधानसभा भरवले आहे. या प्रति विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाजपाचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना बसवण्यात आले. तसेच पहिल्यांदा बोलण्याची संधी राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आली. विखे पाटलांनी विविध मुद्द्यांवरून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी