राज्यात महिलेवर अन्याय झाला की, चित्रा वाघ ‘टायगर’च्या आवेशात नेहमी महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडायच्या. त्यावेळी मंत्री संजय राठोड यांचा तर त्यांनी राजकीय बळीच घेऊन टाकला होता, परंतु जेव्हापासून राज्यात शिंदे फडणवीस सरकर स्थापन झाले आहे तेव्हापासून त्यांचा सूरच बदलला आहे. दरम्यान भंडाऱ्यातील ताज्या बलात्कार घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला असताना चित्रा वाघ यांनी मात्र शांत भूमिका स्विकारल्याचे दिसत आहे. तोंडदाखले साधे ट्विट करण्याचे सुद्धा त्यांनी आज सोपस्कार पार पाडले नसून थेट सरकारची बाजू ठामपणे मांडण्यासाठी चित्रा वाघ पीडितेची भेट घेण्यासाठी निघाल्या आहेत.
सामुहिक बलात्काराच्या घटनेने भंडारा जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. या दुर्देवी घटनेला जबाबदार कोण म्हणून स्थानिक नागरिक प्रशासनाला जाब विचारत आहेत. दरम्यान भाजप आमदार नरेंद्र भोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पोलिस अधिक्षक वसंत जाधव यांची तडकाफडकी बदली केली होती, त्यामुळे जिल्ह्यात पोलिस अधिक्षकपद रिक्त राहिले होते. शिंदे – फडणवीस सरकारच्या या कारनाम्यामुळे जिल्हातील सुरक्षितता, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र होते आणि यावर उत्तर म्हणून क्रुरतेची सीमा पार करणारी सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
हे सुद्धा वाचा
Bhandara Rape Case : एकनाथ शिंदेंनी पोलिसांना दुबळे केले, अन् महिलेवर झाला अघोरी बलात्कार
Nitesh Rane : दीपक केसरकरांच्या आरोपांना भाजप उत्तर देणार, थोड्याच वेळात पत्रकार परिषद
या घटनेत 35 वर्षीय पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष देत दोन वेगवेगळ्या प्रसंगी तीन जणांनी बलात्कार केला. यामध्ये पीडित महिलेवर बलात्कार करून तिला रस्त्यावरच सोडण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला रात्रभर तशीच निवस्त्र रस्त्याच्या कडेला पडून राहिली, वेळेत मदत न मिळाल्याने पीडित महिलेची स्थिती आता गंभीर झाली आहे. प्रत्येक श्वासासाठी तिला झूंज द्यावी लागत आहे. या घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला असून त्या पीडितेच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करीत आहेत.
दरम्यान, राज्यात दरवेळी कोणताही गुन्हा घडल्यानंतर पेटून उठणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यावेळी सुद्धा शांत भूमिकेत दिसून येत आहेत. माध्यामांमधून अन्यायाला न्याय मागणाऱ्या चित्रा वाघ शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून काहीशा मवाळ झाल्याचे दिसून येत आहे. गुन्ह कसाही असो त्यासाठी सरकारला कायम धारेवर धरणाऱ्या वाघ यांची भाषा सध्या बदलल्याचेच पाहायला मिळत आहे.
या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट पसरली असून या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आहे. जसे देवाला प्रसन्न करण्यासाठी जसा बळी दिला जातो तसंच भंडारा जिल्ह्याला नवे पोलिस अधिक्षक मिळवून देण्यासाठी नियतीने एका महिलेला नराधमांच्या दाढेला दिले अशा दबक्या चर्चा सगळीकडे आता सुरू झाल्या आहेत. दरम्यान यावर नवं शिंदे – फडणवीस सरकार काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.