नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याबद्ल चर्चा झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis says We will not allow any injustice to Marathi people)
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा; नीलेश लंके यांची पियुष गोयलकडे मागणी
कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी विधानपरिषद नियम 289 अन्वये मांडला. यावंच चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री फडणवीस हे आश्वासन दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य ऍड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला. (CM Devendra Fadnavis says We will not allow any injustice to Marathi people)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहे. शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. (CM Devendra Fadnavis says We will not allow any injustice to Marathi people)
शेतकऱ्यांच्या कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा; अजित पवार यांची केंद्राकडे मागणी
महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील लोक या मायानगरीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करायला येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले. (CM Devendra Fadnavis says We will not allow any injustice to Marathi people)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. (CM Devendra Fadnavis says We will not allow any injustice to Marathi people)
देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. (CM Devendra Fadnavis says We will not allow any injustice to Marathi people)