महाराष्ट्र

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

 

टीम लय भारी

 

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan) अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार  संजय राठोड  (Sanjay Rathod Resignation) यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा तातडीने मंजूर केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.

परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. पुण्यातील वानवडी भागात इमारतीतून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने आणि त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले होते. पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. त्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले.

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संजय राठोड यांना अखेर पायउतार व्हावे लागले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, राठोड यांचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची बाब बुधवारी पुढे आली आणि पुन्हा एकदा वातावरण तापले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत याबाबत सरकारला जाब विचारला. राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला की नाही याची कल्पना नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांनी तो फ्रेम करण्यासाठी आपल्याकडे ठेवला असेल, असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता तर राठोडांचा राजीनामा फ्रेम केला नाही तरी चालेल पण कायद्याच्या फ्रेमवर्कनुसार त्यांच्यावर गुन्हे फ्रेम केले गेले पाहिजेत, असे शेलार म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीने बचावात्मक पवित्रा घेतला होता. राठोडांचा राजीनामा कुठे आहे हे तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालय सांगू शकेल असे उत्तर नवाब मलिक यांनी दिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक चिघळू न देता मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर पुढील कार्यवाही केल्याचे सांगण्यात येत आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

18 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

18 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

19 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

19 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

20 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

21 hours ago