महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालयकडून एक पत्र जाहीर करण्यात आले आहेत. यात सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना काही निर्देशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Letter released from Chief Minister Devendra Fadnavis’ secretariat)
पत्रानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्ह्यातील दौऱ्याच्या वेळी कोणतेही अधिकारी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणणार नाही. तसेच, मुख्यमंत्री यांनी पोलिस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनेची प्रथा त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पत्र जाहीर केले आहे. (Letter released from Chief Minister Devendra Fadnavis’ secretariat)