स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मारण्यासाठी नथुराम गोडसेला प्रभावी बंदूक शोधण्यात मदत केल्याचा दावा महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र युनिटने तुषार गांधी यांचे हे वक्तव्य निराधार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी व्ही डी सावरकरांवर केलेल्या टिप्पणीनंतर तुषार गांधींचे हे वक्तव्य आले आहे. राहुल यांच्या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांनी टीका केली होती.
तुषार गांधी काय म्हणाले
तुषार गांधी यांनी ट्विट केले की, “सावरकरांनी केवळ ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर त्यांनी बापूंना मारण्यासाठी नथुराम गोडसेला प्रभावी बंदूक शोधण्यातही मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत गोडसेकडे एमके गांधींना मारण्यासाठी विश्वसनीय शस्त्र नव्हते.
हे सुद्धा वाचा
Kokan Festival : मुलुंडमध्ये बुधवारपासून अस्सल कोकणी संस्कृतीचा ‘कोकण महोत्सव’
इंडोनेशिया भुकंपाने हादरले; 46 जणांचा मृत्यू
शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी राष्ट्रपिता यांच्या हत्येचा कट रचल्याचा इशारा महात्मा गांधींच्या सहकाऱ्यांना दिला होता, असा दावाही तुषार गांधी यांनी केला. या संदर्भात तुषार गांधी यांनी ‘सनातनी हिंदूंचे नेते’ सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यावर टीका केली.
(1 of 2) When in 1930s several attempts were made on Bapu’s life. Prabodhankar Thackerey forewarned Bapu’s companions about a plot to kill Bapu in Akola, Vidarbha and saved Bapu’s life. He then issued a public warning to Sanatani Hindu organisations &(Continued)
— Tushar (@TusharG) November 20, 2022
Savarkar not only helped the British, he also helped Nathuram Godse find an efficient gun to murder Bapu. Till two days before Bapu’s Murder, Godse did not have a reliable weapon to carry out the murder of M. K. Gandhi.
— Tushar (@TusharG) November 19, 2022
उद्धव ठाकरेंच्या दादांचा इशारा
दुसर्या ट्विटमध्ये ते म्हणाले, “1930 च्या दशकात जेव्हा बापूंना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला, विदर्भात बापूंच्या हत्येचा कट रचल्याचा इशारा दिला आणि बापूंचे प्राण वाचवले.” यानंतर त्यांनी जाहीरपणे सनातनी हिंदू संघटना आणि महाराष्ट्रातील त्यांच्या नेतृत्वाला बापूंवरील खुनी हल्ल्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला. ते पुढे म्हणाले की, सावरकर आणि हेडगेवार हे सनातनी हिंदूंचे नेते होते, त्यामुळे प्रबोधनकारांचा इशारा त्यांच्यासाठीच होता. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांच्या इतिहासाचा हा भाग लक्षात आणून दिला पाहिजे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या महाराष्ट्र टप्प्यात तुषार गांधी उपस्थित होते. याच दरम्यान राहुल गांधींनी सावरकर यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले होते की हिंदुत्वाच्या विचारसरणीने ब्रिटिशांना मदत केली आणि तुरुंगात असताना भीतीपोटी दयेची याचिका लिहिली. राहुल यांच्या विधानावर भाजपसह शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टीका केली होती. राहुल यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते, असे शिवसेनेतील उद्धव गटाने म्हटले होते. राहुल यांच्या वक्तव्यानंतर तुषार गांधी यांनी सावरकरांवर केलेली टिप्पणी समोर आली आहे.
तुषार गांधींच्या या टिप्पणीवर भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणी (महात्मा गांधी हत्या) निर्णय दिला आहे. अशा आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली. तरीही काही लोक सावरकरांविरुद्ध अशी निराधार टीका करून समाजाची दिशाभूल करत आहेत.