34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब भवनमध्ये भरला उदय सामंत यांचा जनता दरबार!

बाळासाहेब भवनमध्ये भरला उदय सामंत यांचा जनता दरबार!

जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा अग्रक्रम असल्याचे उद्योगमंत्री  उदय सामंत (Uday Samant) यांनी नुकत्याच घेतलेल्या जनता दरबारातून (Janata Darbar) स्पष्ट केले. मंत्रालयाच्या आवारात शिंदे गटाने बाळासाहेब भवन (Balasaheb Bhavan) उभारले असून याच बाळासाहेब भवनमध्ये मंत्री उदय सामंत यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्यासाठी देखील कार्यवाही केली. (Uday Samant Janata Darbar was filled in Balasaheb Bhavan) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे औद्योगिक परिसरात राहणाऱ्या लोकांच्या अनेक अडचणी घेऊन लोक येत असतात. तसेच त्यांच्या मतदार संघातील देखील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उदय सामंत तत्पर असतात. नुकताच त्यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे जनता दरबार भरविला होता. या जनता दरबारात त्यांनी राज्यभरातून आलेल्या नागिरकांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या समस्या सोडविण्यासाठी देखील त्यांनी प्राधान्यक्रम दिला.

उदय सामंत यांनी ट्विटरवर याबाबत एक पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, लोकांच्या अडचणी सोडविणे हे माझे प्राधान्यक्रम असून आज बाळासाहेब भवन, मुंबई येथे जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील शेकडो नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे. ज्या नागरिकांना मंत्रालय व शासकीय कार्यालयात येणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

Get out Ravi : तामिळनाडूत राज्यपालांविरोधात रान तापले

संतापजनक : शाहरुख खानच्या बायकोने मराठीची केली ऐसीतैशी!
जोगेंद्र कवाडेंना रामदास आठवलेंचा विरोध !

औद्योगिक परिसरातील अनेक समस्या, तसेच उद्योगधंदे, एमआयडीसी, मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी घेऊन नागरिक मंत्र्यांककडे येत असतात मात्र अनेकदा मंत्रालयात त्यांना ताटकळत रहावे लागते, अनेकदा त्यांना हेलपाटे घालावे लागतात, यात नागरिकांचा वेळ आणि पैसा देखील जात असतो. त्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सहजपणे मांडता याव्यात, नागरिकांच्या समस्यांचा तातडीने निपटारा करता यावा यासाठी जनता दरबार भरवून लोकांच्या समस्या जलदगतीने सोडविण्यावर मंत्री उदय सामंत यांचा भर असतो.


गाव-खेड्यातून आलेल्या लोकांची फरफट होऊ नये, त्यांना योग्य ठिकाणी त्यांच्या अडचणी मांडता याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करता यावी म्हणून जनता दरबाराव्दारे लोकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सरकारमधील मंत्री करत असतात. मंत्री उदय सामंत यांनी देखील बाळासाहेब भवनमध्ये जनता दरबार घेत लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून अनेकांच्या समस्या देखील मार्गी लावल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी