टीम लय भारी
मुंबई: संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ऑफर देण्यात आली. मात्र संभाजीराजेंची अट नकारली. शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका असणार? असा सवाल उपस्थित केला जात होता.
मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी संभाजीराजेंनी घेतलेल्या पत्रकार परिषद भाष्य केले आहे. गजानन काळे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात.
भावाबद्दल कूटनिती करणाऱ्यांकडून राजेंना फसवले म्हणून काय आश्चर्य वाटून घ्यायचे?
महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये.
हिम्मत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ येवून सांगा की आम्ही राजेना शब्द दिला नव्हता.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 27, 2022
काळे म्हणतात की, छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते.उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल.आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत. अशी टीका मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर केली आहे.
हे सुद्धा वाचा:
आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही : गोपीचंद पडळकर