टीम लय भारी
मुंबई : परदेशवारी करून आलेली कांदिवली येथील ३ कुटुंब कांदिवली पूर्व, अशोकनगर या भागात सर्रास फिरत असून, महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. कांदिवली पूर्व अशोकनगर येथील कदमगिरी सोसायटीमधील ३ कुटुंब दुबई, आबुधाबी, हाँगकाँग येथून गेल्या शुक्रवारी येथे परत आले. मात्र परदेशवारी करून आलेल्या नागरिकांनी किमान १४ दिवस तरी घराबाहेर पडू नका, असे शासनाचे आदेश असताना येथील सदर कुटुंब मात्र सर्वत्र फिरत असल्याने परिसरातील नागरिकांना कोरोनाचा (Coronavirus) धोका असल्याची भीती अशोकनगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
या सोसायटीच्या अ, ब आणि क या तीन विंगला राहत असलेले तीन कुटुंबातील सदस्य सर्रास बाहेर फिरत आहेत. विशेष म्हणजे या अशोकनगर परिसरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात राहात असून, त्यांना देखील या तीन कुटुंबांपासून कोरोनाची लागण होण्याची भीती येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
यासंदर्भात आर दक्षिण वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त संजय कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही आमच्या वैद्यकीय अधिका-यांना पाठवून चौकशी करतो, असे सागितले. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने आता समतानगर पोलिसांनी तरी याप्रकरणी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…