टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ( Maharashtra assembly session 2022) काल गुरुवारी 24 मार्च रोजी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील आमदारांना मोफत घर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्याच्या या घोषणेला राज्यातून संमिश्र प्रतिसाद येत आहे. राज्य सरकार डळमळीत असताना आधीच जनतेचे प्रश्न सुटता सुटत नाहीत मग आमदारांना मोफत घर कशासाठी असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ‘आमदारांना मोफत घरे नकोत, त्याऐवजी जनतेला मोफत वीज द्या’,असे ट्विट् केले आहे. (MNS MLA Raju Patil targets Chief Minister Uddhav Thackeray)
आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा. @OfficeofUT @CMOMaharashtra
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 25, 2022
आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे.त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा,असे ट्विट् करत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी (MNS) राज्य सरकारला टोला लगावला आहे.
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च(अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2022
नेमकी काय आहे मुख्यमंत्र्यांची घोषणा ?
सर्वपक्षीय ३०० आमदारांना घरे देणार pic.twitter.com/Aqot0NXRlw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 24, 2022
हे सुद्धा वाचा –
ED attaches assets of firm owned by brother-in-law of Maharashtra CM Uddhav Thackeray