28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
HomeमुंबईMumbai Terror Attack : मुंबई 26/11 सारखी उडवून देण्याची धमकी, एकास अटक

Mumbai Terror Attack : मुंबई 26/11 सारखी उडवून देण्याची धमकी, एकास अटक

बई वाहतुक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचे 26 मेसेज पाठवले. या मेसेजमध्ये 26/11 सारखा पुन्हा हल्ला मुंबईत करणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. सदर धमकी ही एका पाकिस्तानी फोन नंबर वरून देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतुक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज मिळाला आणि एकच खळबळ उडाली. मुंबईत पुन्हा 26/11 प्रमाणे हल्ला (Mumbai Terror Attack) घडवून आणणार अशा आशयाचा मेसेज मिळाल्याने मुंबईत पोलिसांकडून सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली असून विरार परिसरातून या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या आधी कोकणातील हरिहरेश्वर येथे दोन बोटी संशयास्पदरीत्या सापडल्या होत्या त्यामुळे राज्यात सध्या तणावाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे नेमकं राज्यात चाललंय तरी काय असा पेच सगळ्यांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतुक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचे 26 मेसेज पाठवले. या मेसेजमध्ये 26/11 सारखा पुन्हा हल्ला मुंबईत करणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. सदर धमकी ही एका पाकिस्तानी फोन नंबर वरून देण्यात आली आहे. दरम्यान या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी करून याबाबत कसून चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विरारमधून एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा…

भारताचा आणखी एक क्रिकेटपटू निवृत्ती घेणार

Reservation : ‘पब्जी’, ‘लुडो’ खेळणाऱ्यांही नोकरीत आरक्षण द्या

Shahaji Bapu Patil : एकदम ओके म्हणणाऱ्या शहाजी बापूंच्या मतदारसंघात काहीच ओके नाही

मुंबई पोलिसांना पाठवलेल्या संदेशात मेसेजकर्ता म्हणतो, जर तुम्ही माझे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल, पण स्फोट मात्र मुंबईत होईल. भारतात 6 लोक हे काम पार पाडणार आहेत. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असून याबाबत इतर तपास यंत्रणांना सुद्धा कामाला लागल्या आहेत.

धमकीचा मेसेज मिळण्याआधी रायगड जिल्हातील हरिहरेश्वर येथे संशयित बोटी सापडल्या होत्या त्यानंतर मुंबई उडवण्याचे धमकीचे मेसेज आल्यामुळे राज्यात विशेषतः मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला आहे. या घटनाक्रमांमुळे सामान्य माणसांमध्ये सुद्धा सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खरंच पुन्हा मुंबईवर संकट घिरट्या घालू लागले आहे का असा सवालच सगळीकडून विचारण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी