उर्वशी रौतेला मुंबईमध्ये गणेश दर्शनासाठी आली होती. त्यावेळी लोक तिला पाहून ऋषभ पंतच्या नावाने ओरडू लागले. त्यामुळे उर्वशी रौतेला नाराज झाली. कारण त्यावेळी मोठया संख्यने नागरिक उपस्थित होते. तिने चाहत्यांना स्माईल देखील दिली. परंतु ते ऋषभ पंतच्या नावाने ओरडू लागले, त्यामुळे ती एकदम शांत दिसत होती. मात्र तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावरुन लपत नव्हती. त्या नंतर तिने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी उर्वशी आणि ऋषभ पंत बरोबर नाव जोडले गेले होते. त्यावेळी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे चाहत्यांनी ती दिसताच तिला चिडवायला सुरूवात केली.
या घटनेचा एक व्हिडीओ उर्वशी रौतेला हिने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावेळी तिने एक कॅप्शन दिले आहे. ती लिहिते की, ‘ हे सर्व बंद करा, नाहीतर…’ अशा प्रकारे तिने तिला चिडवणाऱ्यांना सज्जड दम भरला. तिला ऋषभ पंतच्या नावाने ट्रोल करण्यात आले. उर्वशी रौतेला ही मागच्या काही दिवसांपूर्वी भारत पाकिस्तानमध्ये होणारा एशिया कप क्रिकेट मॅच पाहण्यासाठी पोहचली होती. त्यामुळे ती जास्त चर्चेमध्ये आली.
एक वेळेस तिने सांगितले की, मला मॅच पाहणे पसंत नाही. मात्र ती अचानक मैदानात आल्यामुळे लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. त्यामुळेच लोकांनी ऋषभ पंत बरोबर तिचा संबंध पुन्हा जोडला. तिला चिडवू लागले. त्यामुळे ती आता चिडवणाऱ्या तिच्या चाहत्यांवर संतप्त झाली आहे.
हे सुद्या वाचा :
Neeraj Chopra : नीरज चोप्राचा ‘भाला’ सुसाट, आतापर्यंत कमावले ‘इतके’ पदक
Queen Elizabeth II : महाराणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 10 दिवसांनी होणार अंत्यसंस्कार
कोण आहे उर्वशी रौतेला ?
उर्वशी रौतेला हिचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 मध्ये झाला. ती एक सिने अभिनेत्री तसेच मॉडेल आहे. तिने आपल्या करिअरची सुरूवात अनिल शर्माच्या ऍक्शन-रोमांच या चित्रपटापासून केली. 2012 मध्ये मिस इंडिया या पदाची ती मानकरी ठरली. तिने दिल्ली येथील गर्गी कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटाचे तिने डेब्यु केले. मि. ऐरात या कन्नड चित्रपटातही तिने डेब्यु केले. त्यानंतर तिने ‘भाग जॉनी’ हा चित्रपट केला. ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती रागिनी’, ‘काबिल’, ‘पोरोबाशिनी’, ‘हेट स्टोरी’, ‘पागलपंती’, ‘वर्जिन भानुप्रिया’ आदी चित्रपटात तिने काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…