टीम लय भारी
मुंबई: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्विट करत अभिनव आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या भोंग्यावरुन राजकारण तापले असताना काँग्रेस भोंग्यांवरुन मोदींच्या अच्छे दिनाचा पाढे वाचणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अच्छे दिन आने वाले है या घोषणेचा वापर आता कॉंग्रेस मोदींविरोधात करणार आहे.
देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होतं आहे. खाद्यतेलाचे भाव देखील वाढत आहे. महागाई वाढत असताना सरकारकडून जनतेला दिलासा काही मिळताना दिसत नाही. मात्र सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. म्हणून कॉंग्रेस हे आंदोलन करणार आहे.
मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार! pic.twitter.com/bx5Wede1lu
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 19, 2022
राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राज्यात भोंगा व हनुमान चालीसा पठणावर मोठा वाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया येतं आहे. महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेत्यांनी भोंग्यांवर आपली प्रतिक्रीया देतं राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.
हे सुद्धा वाचा :
राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला!: नाना पटोले
Keep Patole Under Observation, Check His Mental, Physical Health, Maha BJP Chief Tells Cong