30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभारतीय जनता पार्टीने दिलेली स्क्रिप्ट हीच गिरवायची ; एवढेच काम राज ठाकरेंना...

भारतीय जनता पार्टीने दिलेली स्क्रिप्ट हीच गिरवायची ; एवढेच काम राज ठाकरेंना राहिले आहे!’

टीम लय भारी 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यात शरद पवार यांनी जातीजातीमध्ये विष पेरले त्यामुळे समाजात दुही निर्माण झाली, असा आरोप मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीने दिलेली स्क्रिप्ट हीच गिरवतात आहे. हे एकच काम आता शिल्लक राहिलेले आहे. अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे. NCP criticize Raj Thackeray

राज ठाकरेंनी शिक्षणाचा,आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम दिला असता तर आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले असतं असं ही त्यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारचा नवीन सामाजिक व राजकीय विचार राज ठाकरे देऊ शकले नाही म्हणूनच आतापर्यंत राजकारणात त्यांचा पक्ष अपयशी ठरलेला अशी जोरदार टीका तपासे यांनी केली आहे.

पवारसाहेबांसारख्या (NCP) कृतिशील नेत्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही, आणि म्हणूनच त्यांच्यावर काही नेते बोलतात. पवारसाहेबांच्या नखाइतकी उंची जर राज ठाकरेंची असती तर नक्कीच ते एक कर्तुत्ववान नेते म्हणून राज्यामध्ये वावरले असते, असेही तपासे म्हणाले.

हे सुद्धा वाचा: 

संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाची लेझर शोच्या माध्यमातून माहिती मिळणार, मुख्यमंत्र्यांची सूचना

Koregaon-Bhima probe panel asks Sharad Pawar to appear before it on 5 and 6 May

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी