केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी प्रथमच दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग (एक्सप्रेस वे) चे फोटो शेयर केले आहेत. (Mumbai Delhi Express Way Photos Shared By Nitin Gadkari) दिल्ली मुंबई द्रुतगती एक्सप्रेस वेवरील बडोदा ते विरार विभागादरम्यानचे छायाचित्र पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा फोटो पाहून कुणालाही आपण परदेशातील फ्री वे पाहत असल्याचा भास होईल. या एक्सप्रेस वे मुळे मुंबई-दिल्ली फक्त 12 तासात प्रवास सुसाट होणार आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधून जाणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे अनेक सेक्शनमधील काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. यात बडोदा-अंकलेश्वर, दिल्ली-जयपूर, मध्य प्रदेशात पसरलेले अनेक विभाग आहेत. नितीन गडकरी यांनी हे फोटो ट्विटद्वारे शेयर करतांना त्याला #PragatiKaHighway #GatiShakti हे हॅशटॅग वापरुन देश प्रगतीने विकासाच्या महामार्गावर जात असल्याचे म्हटले आहे. गती शक्ती हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील दळणवळण सुलभ व वेगवान करणारा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो.
देशातील सर्वात जलद वेगाने तयार झालेला एक्सप्रेस वे
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेची पायाभरणी 2019 मध्ये झाली. त्यासाठी 80 लाख टन सिमेंट आणि 10 लाख टन स्टीलचा वापर केला जाणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातील सर्वात जलद वेगाने तयार झालेला एक्सप्रेस वे बनणार आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा स्टार्टिंग पॉईंट (प्रारंभ बिंदू)
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचा प्रारंभ बिंदू (स्टार्टिंग पॉईंट) हा दिल्लीतील नोएडा येथील डीएनडी उड्डाणपूल आणि हरियाणातील गुरुग्रामजवळ सोहना येथे असेल.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे मुळे देशातील अनेक प्रमुख शहरे जोडली जाणार आहेत. हा आठपदरी एक्स्प्रेस वे असेल. बडोदा, सुरत, अहमदाबाद, उज्जैन, इंदूर, भोपाळ, उदयपूर, कोटा, अजमेर आणि जयपूर यांसाराखी प्रमुख शहरे या द्रुतगती महामार्गामुळे जोडली जातील.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे शेवटचे ठिकाण (एंड पॉईंट)
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातील विरार आणि पनवेल-उरणजवळील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे संपेल.
फोटो क्रेडिट्स : Twitter – @Nitin_Gadkari, @cbdhage
हे सुद्धा वाचा :
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल : नितीन गडकरी
Nitin Gadkari : गडकरी म्हणतात दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; पुढची निवडणूक लढण्याबाबत म्हणाले…
भाजपाची अवस्था कळपात वाघ शिरल्यानंतर भेदरलेल्या मेंढरांसारखी