सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. यावेळी 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांच्या यात्रेतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. याबाबत संक्षिप्त माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.
“नफरत छोडो भारत जोडो” हा नारा देत सात सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतुन सुरू झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने आत्तापर्यंत हजारो किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करत सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला.
महाराष्ट्र मधील नांदेड जिल्हात सोमवारी (7 नोव्हेंबर) रात्री ही यात्रा पोहचली. तिथे पोहचतात राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी एक भव्य मशाल यात्रा देखील काढली.
कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा आता काश्मीरपर्यंत कुणीही रोखू शकणार नाही- राहुल गांधी
गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने त्यांनी नांदेडमधील देगलूर येथील गुरुद्वारामध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी गुरुद्वाऱ्यामध्ये प्रार्थना केली.
सोमवारी रात्री अडीच वाजे पर्यत राहुल गांधी यांच्या हस्ते बाबा फतेह सिंह गुरुद्वारामध्ये प्रार्थना करण्यात आली.
मंगळवारी (8 नोव्हेंबर) येथुनच भारत जोडो यात्रा आपल्या पुढच्या प्रवासाचा आरंभ करणार आहे.