टीम लय भारी
मुंबई : अख्ख्या महाराष्ट्रात पाताळयंत्री दांपत्य असे बिरूद राणा पती – पत्नीने प्राप्त करून घेतले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यानही पतीदेव रवी राणा यांनी हे बिरूद मिरवले. माझ्यावर ‘महाविकास आघाडी सरकार’ने दबाव आणला. माझे मतदान सत्ताधारी पक्षाला व्हावे यासाठी पोलिसांमार्फत त्रास दिला गेला, अशा शब्दांत पतीदेव राणा यांनी थयथयाट केला.
हनुमान चालिसाचे पेटंट राणा यांनी गेल्या काही दिवसांत स्वतःकडे घेतले आहे. त्या अनुषंगाने मतदानाला जाताना हनुमान चालिसाची प्रत सोबत ठेवली होती, असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला ५६ वर्षे झाली. या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्रात अतिशय वाईट सरकार सत्तेत आल्याचा शोध राणा यांनी लावला.
हे सुद्धा वाचा :
VidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले
विधानपरिषदेवर चालणार कोणाची जादू ?