टीम लय भारी
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस हे वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
अपघात अटळ आहे.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
कालच्या सभेत फडणवीस यांनी असं म्हटलं की, शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबईची किती वाट लागली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमच्या सरकारच्या काळात मुंबईच्या विकासासाठी सुरू केलेल्या सर्व योजना व प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात ठप्प झाले आहेत. परिणामी मुंबईकरांना त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
हे सुद्धा वाचा:
शिवसेनेचे संजय राऊत यांनी “एक राष्ट्र, एक भाषा” या विषयावर अमित शाह यांची केली पाठराखण
NEET 2022 Applications Closing Soon; Know Major Changes This Year