33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीलंकेत जी स्थिती आहे तशी भारतात येईल : संजय राऊत

श्रीलंकेत जी स्थिती आहे तशी भारतात येईल : संजय राऊत

टीम लय भारी 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी देशात सुरु असलेल्या घटनावर भाष्य केलं आहे.  मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवलं पाहिजे. नाहीतर श्रीलंकेत जी स्थिती आहे तशी भारतात येईल. sanjay raut on bjp government

श्रीलंकेत जसं राज्यकर्त्यांना रस्त्यावर धरून बदडलं, राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत, त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत ही परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर राज्यकर्ते आणि राजकारण्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावं असं संजय राऊत (sanjay raut)  यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणतात की, देशाचा रुपया ७७ रुपये प्रति डॉलर इतका खाली घसरला आहे. इतिहासात रुपया इतका खाली घसरला नव्हता. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. लोकांना नोकऱ्या नाहीत, महागाईशी सामना करता येत नाही. राज्यकर्ते आणि सर्व पक्षांनी यावर बोलणं गरजेचं आहे,”

हे सुद्धा वाचा : 

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

BJP MP Claims Land on Which Taj Mahal Was Built Originally Belonged to Jaipur Ruler Jai Singh

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी