टीम लय भारी
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काश्मीरमधील हत्यासत्रावर भाष्य केले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणतात की, काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे.
खरं तर आजे जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
सध्या काश्मीरमधील परिस्थीती गंभीर आहे. आज काशमीर खोऱ्याची स्थिती १९९० मध्ये होती तशीच झाली आहे. आज काश्मिरी पंडितांना आपलं घर सोडाव लागत आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही.
गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे,” संजय राऊतांनी म्हटलं. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा:
धनंजय मुंडेंची काकांसाठी भावनिक पोस्ट
Punjab CM Bhagwant Mann visits Sidhu Moosewala’s home in Mansa, expresses condolences to family