टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’ ( Covid19 ) आपत्तीमध्ये राज्यपालांकडून अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण होणार होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
‘कोरोना’च्या ( Covid19 ) अनुषंगाने नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी पवार यांनी ही तक्रार केली आहे. या चर्चेचा तपशिल पवार यांनी ट्विटरवरून प्रसारित केला आहे. ‘राज्य पातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की, माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमीत होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत’ असे पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. #coronavirus @PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
#COVID_19 नंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
अनेक राज्यांमध्ये असा प्रकार घडत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचा थेट उल्लेख त्यांनी केलेला नाही. परंतु अन्य राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही असा प्रकार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र सरकार राज्यपालांच्या माध्यमातून राज्यांवर अंकुश ठेवत आहे की काय अशीही शंका पवार यांच्या या ट्विटमुळे निर्माण झाली आहे.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी पवार यांनी यावेळी अनेक महत्वाच्या सुचना केल्या. मरकजसारख्या घटनांतून सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी पवार यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्र सरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा.#coronavirus
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. ह्या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी.@PMOIndia #LetsFightCoronaTogether
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
देशात संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे बरच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार व्हावा. आरोग्याशी लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉक डाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पाहावे.#COVID_19
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
#COVID_19 चे गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. @PMOIndia #LetsFightCoronaTogether #coronavirus
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 8, 2020
हे सुद्धा वाचा