29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्रीडाइंग्लंडचा पाकिस्तानवर विजय पण फायदा मात्र टीम इंडियाला, वाचा संपूर्ण समीकरण

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय पण फायदा मात्र टीम इंडियाला, वाचा संपूर्ण समीकरण

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 74 धावांनी विजय मिळवला. इंग्लिश संघाच्या या विजयाचा टीम इंडियाला खूप फायदा झाला आहे. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या शर्यतीत सामील झाली आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 74 धावांनी विजय मिळवला. इंग्लिश संघाच्या या विजयाचा टीम इंडियाला खूप फायदा झाला आहे. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या शर्यतीत सामील झाली आहे. वास्तविक, पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडियाला आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत एक सामना जिंकावा लागेल. भारतीय संघ सध्या 52.08 गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता संभाव्य सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारू शकते.

टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहोचेल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धची आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत संघाला एक सामना आपल्या नावावर करावा लागेल. दुसरीकडे, समीकरणांनुसार, ऑस्ट्रेलियन संघाने सध्याच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली, तर संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

हे सुद्धा वाचा

अशा वातावरणात त्यांनी येथे येऊ नये अन्यथा…, बोम्मईंचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला इशारा

इंदू मिलवरील स्मारक लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापरिनिर्वाण दिनी ग्वाही

बाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त

भारतीय संघाला सध्या 52.08 टक्के गुण आहेत, जर टीम इंडियाला एकही डिमेरिट गुण मिळाला नाही तर तो 68.05 गुणांवर पोहोचू शकतो. अंतिम फेरी गाठण्यासाठी हे अनेक गुण टीम इंडियासाठी पुरेसे ठरू शकतात. मात्र, भारताला बांगलादेशविरुद्धची आगामी कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे.

इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला होता
यजमान पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे गेला आहे. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी 342 धावांची गरज होती, पण यजमानांचा संघ 268 धावांत गुंडाळला गेला. अशा प्रकारे बेन स्टोक्सच्या संघाने हा सामना 74 धावांनी जिंकला.

आता या पराभवानंतर पाकिस्तानी संघाच टेन्शन वाढलं आहे. शिवाय त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धजक मारण्याचे स्वप्न देखील भंग पावण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध पाकिस्तान असा कसोटी सामना पाहण्यासाठी आतुर असलेल्या क्रिकेट चाहत्यांचा देखील हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी