राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवससाजरा होत आहे. बारामतीच्या पवार कुटुंबातील शेतीमातीत रमणारा हा मोकळ्या ढाकळ्या मनाचा माणूस राज्याचे उपमुख्यमंत्रीपद एकदा नव्हे तर चौथ्यांदा सांभाळत आहेत. राज्याच्या प्रशासनापासून शेताच्या बांधापर्यंत बारीक अभ्यास असणारे अजित पवारांचा नेतृत्व घडले कसे याचा उलगडा जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडला आहे.
अजित पवार यांचे बालपण, शिक्षण, शेती, उद्योग आणि पुढे राजकारण असा मोठा पट या मुलाखतीत अजितदादांनी सांगितला आहे. लहानपणी शाळेत असताना खेळाची आवड असल्याने चपळपणा अंगात आला क्रिकेट टिमचा कॅप्टन, खो-खो, कबड्डी असे खेळ त्यानंतर गणेशोत्सवात नेहमी पुढाकार घेणे यातूनच त्यांच्या अंगी नेतृत्त्व करण्याची कला मुरत गेली. शरद पवार यांच्या निवडणुक प्रचार देखील ते लहानपणी करत असायचे अशी जडणघडण सुरु होती. घरातील कडक शिस्त, राहण्यात निटनेटकापणा, निर्व्यसनी, आणि एखादे काम हातात घेतले की धसास लावल्याशिवाय विश्रांती घ्यायची नाही हा त्यांचा स्वभावगुण त्यांना राजकारणात देखील ‘दादा’ करुन गेला.
अजित पवार तरुणवयात शेती करत होते. शेतीबरोबरच शेतीपुरक उद्योग देखील ते सांभाळायचे पोल्ट्री फार्म, दुधाची डेयरी, असे उद्योग त्यांनी केले. त्याचबरोबर शेतात अनेकप्रकारची पिके, फळबागांची लागवड देखील ते करत असत. त्यांच्या याच काळात आसपासच्या लोकांची मदत देखील करायचे, लोकांच्या सरकारी कार्यालयातील अडीअडचणी देखील सोडवायचे. तो काळ साधारण १९८० च्या दरम्यानचा होता. याच काळात ते गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यानिवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्ट झाले. हे सगळे सुरु असाताना शरद पवार यांना शरद पवार आणि राजीव गांधी यांनी त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातून खासदारकीचे तिकीट दिले. देशात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन ते खासदारकीला प्रचंड बहुमताने निवडुण आले, असल्याचे देखील अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.
हे सुद्धा वाचा
विरोधी पक्ष नेत्याविना पार पडला पावसाळी अधिवेशनाचा आठवडा
IAS Transfers : राधाकृष्ण विखे पाटलांची इच्छा पूर्ण झाली, तुकाराम मुंढे आले सोबतीला; राज्यातील ४१ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
अतूल भातखळकरांच्या ‘त्या’ ट्विटनंतर नाना पटोले भडकले!
त्याच काळात शरद पवार यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात बोलावणे आले. त्यांनंतर अजित पवार हे राज्यात विधानसभेत आले आणि शरद पवार देशाच्या संसदेत गेले. त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी त्यावेळी झालेल्या चर्चेची देखील आठवण सांगितली. शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर अजित पवार १९९१ साली दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार म्हणून आले. १९९१ साली ते राज्यमंत्री मंत्री झाले. तेव्हा पासून आजतागायत ते बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत विधानसभेत निवडुण येत आहे. राज्यमंत्री, विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री, विरोधीपक्ष नेता, राज्याचे उपमुख्यमंत्री असा त्यांचा आजवरचा राजकारणातील प्रवास झाला आहे.