छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या वंदनीय व्यक्तींबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर त्यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी केली होती. कोश्यारी यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर अनेक ठिकाणी कोश्यारींच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची कोंडी झाली होती. महाराष्ट्रातून कोश्यारी हटाव या मोहिमेला लोकांनीही पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे राजकीय दबाव वाढत चालला होता. या पार्श्वभूमीवर आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यादरम्यान केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. (Bhagat Singh Koshyari’s resignation accepted An atmosphere of joy among opponents)
महाराष्ट्राची सुटका झाली
रमेश बैस यांनी घटनेनुसार काम करावे
”देर आये दुरुस्त आये”
“महाराष्ट्रातली घाण गेली”
निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही भाजपची खेळी