31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
HomeराजकीयDhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा 'ऐक' नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांचा ‘ऐक’ नाथ होऊ नये,धनंजय मुंडेंची कोपरखळी !

राज्याचे 'नाथ' म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 'एकनाथ'च राहावे, 'ऐकनाथ' होऊ नये अशी कोपखळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. नगर परिषद अध्यक्ष हे जनतेतून थेट निवडले जावेत. या विधेयकावर चर्चा होत असतांना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध केला.

यावर्षीचे विधानपर‍िषदेचे पावसाळी अधिवेशन खूप गाजले आहे. नवीन सरकारचे हे पहिलेच अध‍िवेशन आहे. मागच्या वेळी सत्तेमध्ये असलेले या वेळी विरोधी बाकावर बसले आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. या वेळी विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनी इडी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. आजचे सोमवारचे अधिवेशन चांगलेच रंगले. ते नगर‍ परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत या विधेयकावरुन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान सभेत तुफान फटकेबाजी करुन सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यंमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो.

राज्याचे ‘नाथ’ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ‘एकनाथ’च राहावे, ‘ऐकनाथ’ होऊ नये अशी कोपखळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. नगर परिषद अध्यक्ष हे जनतेतून थेट निवडले जावेत. या विधेयकावर चर्चा होत असतांना धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध केला. मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. त्यांनीच निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडायचा न‍िर्णय मंत्रीमंडळात मंजुर करुन घेतला होता आणि आता त्यांनी भाजप सोबत घरोबा केला आहे. त्यानंतर त्यांनी बरोबर याच्या विरुध्द निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी ऐकनाथ होऊ नये असा सल्ला धनंजय मुंडेनी दिला.

हे सुद्धा वाचा

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

Vinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर पाणी फिरेल. जर असा निर्णय घेतला तर, नगर परिषद निवडणुकीत पक्ष कोणता आण‍ि नगराध्यक्ष कोणता अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याउपर हा निर्णय घ्यायचा असेल तर मग मुख्यमंत्री हा जनतेतून होऊ द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी सरकारला केले. धनंजय मुंडेच्या या विधावरुन सर्व पक्षांतील‍ नेत्यांना हसू अवरले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी