राजकीय

देवेंद्र फडणवीस देणार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपप्रणित एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या निकालात महायुतीला महाराष्ट्रातून १७ जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला ०९, शिंदेंच्या शिवसेनेला ०७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे राज्यातून ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे.त्यानंतर काल मुंबईत भाजपची लोकसभेच्या या पराभवाची कारणे शोधण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या वरिष्ठांनी मला राज्यातील सरकारमधून मोकळ करावं असे म्हणत राज्यातील झालेल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाचा (CHIEF Minister) राजीनामा ( resigns) देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.(Devendra Fadnavis resigns as Deputy CHIEF Minister)

यावेळी बोलतांना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात (Maharashtra) अपेक्षित यश न मिळाल्याने झालेल्या या पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचे (Election) नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, “भाजपाला महाराष्ट्रात सामना कराव्या लागलेल्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचे आहे. त्यामुळे मी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळं करणार आहे”, असेही त्यांनी (Devendra Fadnavis) म्हटले.

दरम्यान, सध्या देवेंद्र फडणवीसांकडे महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व इतर महत्त्वाच्या खात्यांचा जबाबदारी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला या सर्व जबाबदाऱ्यांमधून मोकळं करून राज्यात पक्षाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

9 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

10 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

10 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

11 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

13 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

13 hours ago