32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयसर्वसामान्यांच्या हितासाठी बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोलचे काम केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वसामान्यांच्या हितासाठी बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोलचे काम केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे हिमालयाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. धाडस आणि आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला. त्यांच्या विचारात ओतप्रोत राष्ट्रभक्ती भरलेली होती. विचारांशी तडजोड त्यांनी कधी केली नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी रिमोट कंट्रोलचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. (Eknath Shinde Said Balasaheb Thackeray did the work of remote control for the benefit of common people)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची शिकवण, विचार आणि ऐंशी टक्के समाजकारणाचा वारसा घेऊन पुढे जात आहोत. विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावले जातेय हा महत्वाचा क्षण आहे. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी राज्य चालवले. सर्वसामान्यांपर्यंत सत्ता पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांच्या परीस स्पर्शाने अनेकांचे सोने झाले. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक विचारधारांचा मिलाफ आढळून यायचा. विभिन्न क्षेत्रातील अनेकांवर संकटे आली तेव्हा त्यांच्या पाठीमागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी नेहमी केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेबांनी तत्त्वासाठी राजकारण केले : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील जसा विशाल महासागर आहे तसे आणि आवश्यक तेव्हा तुफानापेक्षा अधिक संघर्ष करणारे बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व होते. चा मनाचा मोठेपणा हा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही अनुभवल्याची आठवण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली. स्पष्टवक्तेपणा हा बाळासाहेबांचा गुण होता. एकदा बोललेलं वक्तव्य परत घेण्याची वेळ त्यांनी येऊ दिली नाही. तत्वासाठी कायम राजकारण केले. त्यांनी कधी जातपात पहिली नाही. अनेकांना त्यांनी निवडून आणून दाखवले. जातिव्यवस्थेचा पगडा कमी करण्याचे काम त्यांनी केल्याचे, फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर म्हणाले, की स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समाजकारणाची संधी मिळाली. त्यांनी सामान्यांतील सामान्य माणसावर विश्वास दाखविला. त्यांच्या विचारानुसार महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.
विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या की, जातीपातीच्या पलिकडे जाऊन बाळासाहेबांनी काम केले.
राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बाळासाहेब हे देशाला दिशा देणारे नेतृत्व होते, असे सांगितले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंना आव्हान; होऊन जावूद्या आमनासामना!

IAS योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

अंधेरी ते बोरिवली 20 मिनिटांत तेही अवघ्या 40 रुपयांत!

विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यांचे राष्ट्रहिताचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील. मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिला. त्यांच्यामुळेच मुंबई पुणे एक्स्प्रेस वे होऊ शकला, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना संघटना स्थापन केली. त्यांनी मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी