राजकीय

Prakash Ambedkar : ‘आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत’

शिवसेनेविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला आणि महाविकास आघाडीचे सरकारच पुर्णपणे कोसळले. बंड शिंदेंनी केला असला तरीही या संपुर्ण परिस्थितीला कारणीभूत राष्ट्रवादी काॅंग्रेस असल्याचा ठपका अनेकांनी ठेवला. दरम्यान हाच मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा राष्ट्रवादीवर टीका करत शिवसेनेसोबत उभं राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीनेच महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा उचलला होता असा थेट आरोपच प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. दररोजच्या या आरोप – प्रत्यारोपाच्या खेळीत राजकीय चक्रे वेगाने फिरू लागली आहेत, त्यामुळे राज्यात काही वेगळं चित्र पाहायला मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी सांगलीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आंबेडकर यांनी आपण शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा उचलला होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही असे म्हणून सध्याच्या स्थितीतील वंचित बहुजन आघाडीची भूमिका आंबेडकरांनी स्पष्ट केली.

हे सुद्धा वाचा…

Mother Kills Daughter: पालघरमध्ये आईने स्वत:च्या मुलीला मारून कचरापेटीत पुरले

BMC : कामावर झोपी गेलेल्यांचे चित्रीकरण करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या विरोधात युनियन उभी

PWD : पीडब्ल्यूडीतील ‘बदली’ घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

बंडासाठी शिवसेना आमदार एकत्र आले आणि भाजपला सत्तास्थापनेसाठी आयती संधी चालून आली. या सत्तासंघर्षाला कारण बंड ठरले असले तरीही या सगळ्याचमागे राष्ट्रवादी कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री राष्ट्रवादीचा असल्याकारणाने वेगवेगळ्या मतदारसंघात जिथे राष्ट्रवादी नाही तिथे तिथे जाणीवपुर्वक कमी निधी दिल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे निधीवाटपात दुजाभाव करत असल्यानेच शिवसेना आमदारांचे दरवेळी खच्चीकरण झाल्याचे सुद्धा राष्ट्रवादीवर आरोप करण्यात आला आहे. शिवाय प्रकाश आंबेडकरांनी या मुद्यावर भाष्य करत सरकार पाडण्याचा विडा उचलल्याचे म्हटल्याने राष्ट्रवादीच्या गोटातून उलट सूलट चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर सुद्धा थेट निशाणा साधला. आंबेडकर यावेळी म्हणाले, देशाची राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. नेहरुंनी कबुतर सोडली होती. मोदींनी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं आंबेडकर म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडून सरकारी संपत्ती विकण्यावरून ज्या पद्धतीची टिप्पणी करण्यात आली, ती पाहता आपण दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका करताना सांगितलं होतं, की एखाद्या दारुड्याला दारुसाठी पैसे मिळाले नाही की, तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो, तशाच पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दारुड्याप्रमाणे वर्तन असल्याचे सांगितले होते. याला आता रिझर्व बँकेकडून दोन महिन्यांपूर्वी पुष्टी देण्यात आलेली आहे, असे म्हणून आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर सुद्धा सडकून टीका केली आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago