33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअयोध्येच्या जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे : संजय राऊत

अयोध्येच्या जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे : संजय राऊत

टीम लय भारी

अयोध्या : भाजपने राममंदिराचे राजकारण बंद करावे, असा घणाघात आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे येत्या १५ जूनला अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यापार्श्वभूमीवर संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना (Sanjay Raut) नेत्यांनी आयोध्येत हजेरी लावली आहे. (Sanjay Raut Said People of Ayodhya love Thackeray family)

एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई,सूरज चव्हाण,अनिल तिवारी,जीवन कामत सह संजय राऊत (Sanjay Raut) आयोध्येत उपस्थित आहेत. या दौऱ्या दरम्यान संजय राऊत म्हणाले की, मधल्या काळात काही जणांना अयोध्येतील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, पण अयोध्येच्या जनतेच्या मनात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड श्रद्धा आहे.

आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्या आणि आसपासची जनता प्रचंड उत्सुक आहे. १५ तारखेला लखनऊला आदित्य ठाकरे यांचे आगमन होईल तेथून ते अयोध्येला येऊन दर्शन घेतील. राम मंदिराचे काम सुरू आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देतील. शिवसेनेच्या वतीने शरयूच्या तिरावर (Sanjay Raut) एक नेत्रदीपक आरतीचा सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे, त्यात देखील आदित्य ठाकरे आपली हजेरी लावणार आहेत.

अयोध्येच्या जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे : संजय राऊत

त्याच बरोबर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपाला सल्ला देखील दिला. ते म्हणाले, हा एक श्रद्धेचा कार्यक्रम असून, यात राजकारण अजिबात नाही. मंदिराचे राजकारण आता संपवा. मंदिरात आता श्रद्धा आणि अध्यात्म याचाच वास असावा.

हे सुद्धा वाचा : – 

Wanted Rajya Sabha Polls Postponed Because…: Sena’s Sanjay Raut

कचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही : जितेंद्र आव्हाड

पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी : जयंत पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी