टीम लय भारी
औरंगाबाद : मुंबई राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी (2022-23) मघ्ये ५०० कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिल्याचं समोर आलं आहे(Subhash Desai informed, 500 crore sanctioned in Aurangabad).
जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व अन्य जिल्ह्यातील रुग्णांना औरंगाबाद शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे नेण्यासाठी व अधिक सुविधा सुलभ करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून घेतले असून. परिणामी जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी 500 कोटी पर्यंत वाढविण्यात आली असून यंदाच्या 2022-23 पायाभूत सुविधांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेच्यावतीने आभार मानले.असून ही माहिती आपल्यापर्यंत पोहचवली आहे.
हे सुद्धा वाचा
औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना वेग
खुशखबर! आता मुंबईकरांना शिर्डीला फक्त तासाभरात पोहोचता येणार