टीम लय भारी
मुंबईः आज राज्याच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. या अधिवेशामध्ये ‘तीन‘ महत्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या. त्यामध्ये हिरकणी गावाला 21 कोटींचा निधी जाहिर केला. तसेच इंधनावरील व्हॅट कमी करण्यात येईल आणि आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यात येईल. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या या घोषणेमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बळीराजाला सुखाचे दिवस येण्यासाठी भाजप शिवसेना युतीचे सरकार प्रयत्न करेल. पहिल्या दिवसांच्या भाषणातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे सांगितले होते.
सिंचनाच्या माध्यमातून शेतीला मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल. राज्याला‘सुजलाम सुफलाम‘करण्यात येईल, असे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राज्यातील जनतेला दिले.
हे सुध्दा वाचा:
कुल्लूमध्ये बस दरीत कोसळली ; 16 जणांचा मृत्यू
एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु असतांना फडणवीसांनी लावला‘डोक्याला‘ हात