टीम लय भारी
नवी मुंबई : मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यानी (Uddhav thackeray) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यापैकी एक निर्णय हा सारथी संस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय झाला.(Uddhav thackeray decision to allot land Navi Mumbai)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला निर्णय pic.twitter.com/bSVWfAf— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 26, 2022
राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र सुविधा (Uddhav thackeray) विकसित करण्यात येणार आहेत.
तसेच विद्यार्थ्यांसाठी 500 मुलांचे व 500 मुलींचे स्वतंत्र निवासी वसतिगृहदेखील विकसित करण्यात येईल. या अंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार ५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा हा भूखंड नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन (Uddhav thackeray) विभागास देण्यात येणार आहे.
हे सुद्धा वाचा :-
Wear mask, Covid-19 cases on the rise: Maharashtra CM Uddhav Thackeray
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत : गोपीनाथ गडाचं प्रोफाईल ठेवण्याचं जनतेचं आवाहन
फडणवीस सरकारने केलेल्या त्या पापाची फळे आजही धनगर समाज भोगत आहे : किशोर मासाळ