विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तरे तासादरम्यान उल्हासनगरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासन कोणती ठोस उपाययोजना करणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
यामध्ये शासन आणि महानगरपालिका यांच्या ढिसाळ नियोजनामुळे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दीडपट दंडाची आकारणी करून पाणी मिळते. ही रक्कम उल्हानगरच्या नागरिकांकडून वसूल केली जाते यात त्यांचा काय दोष आहे? असे प्रश्न मांडले. तसेच मुख्यमंत्री प्रश्नोत्तर तासाला गैरहजर असल्याने त्याबाबत अजित पवार यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली.