28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeव्हिडीओपुलवामा : 40 जवानांचे बळी; मोदी म्हटले गप्प राहा !

पुलवामा : 40 जवानांचे बळी; मोदी म्हटले गप्प राहा !

"मिस्टर क्लीन" अशी प्रतिमा मिरविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुलवामा हल्ला प्रकरणात पुरते वस्त्रहरण झाले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच 2019 मधील पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

“मिस्टर क्लीन” अशी प्रतिमा मिरविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुलवामा हल्ला प्रकरणात पुरते वस्त्रहरण झाले आहे. “40 जवानांचे बळी; मोदी म्हटले गप्प राहा !” हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच 2019 मधील पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

सत्यपाल मलिक यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना वायर या न्यूज वेबसाईटसाठी दिलेल्या मुलाखतीत अनेक सनसनाटी दावे केले आहेत. करण थापर हे तेच पत्रकार आहेत, ज्यांच्या मुलाखतीतून तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुलाखत अर्धवट टाकून निघून गेले होते.

 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 2019 मध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या म्हणजेच सीआरपीएफ (CRPF) ताफ्यावर हल्ला झाला होता. यात 40 जवानांचे बळी गेले होते. केंद्र शासनाच्या गुप्तचर व इतर यंत्रणांच्या निष्क्रियता तसेच केंद्र सरकारच्या निष्काळजीपणातूनच ही घटना घडल्याचा आरोप मलिक यांनी केला.

हे सुद्धा वाचा :

नरेंद्र मोदी : हे कसले 56 इंची, हे तर मुडदूस बालक

अंधभक्तांचे विश्वगुरू गप्प का ? संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल

द मोदी क्वेश्चन : आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार वापरुन केंद्राने बीबीसी डॉक्युमेंटरी केली ब्लॉक

 

पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबद्दल काहीएक अडचण नाही, त्यांना अनेक गोष्टींची माहितीही नसते. मोदी फक्त स्वत:त रममाण असतात, असेही मलिक यांनी म्हटले आहे. त्यानंतर ट्विटरवर #CorruptPradhanMantri ट्रेंड जोरात आहे.

Modi Responsible for Pulwama, CRPF Jawans Death, Satyapal Malik, Karan Thapar, Corrupt Pradhan Mantri

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी