टीम लय भारी
मुंबई : राज्यातील काही बंडोपंतांनी एका पावसाळी सहलीचे आयोजन केले आहे. ते मुंबईहून सुरत आणि सुरतहून आसामची राजधानी गुवाहटीला गेले आहे. 50हून अधिक जण पावसाळी सहलीला गेल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहे. सहलीला जाण्यासाठी त्यांनी चार्टर प्लेनचा वापर केला. ते पंचतारांकीत हाॅटेलमध्ये थांबले. त्यांना गुजरात पोलिसांनी सुरक्षा पुरवली. ते महागडे जेवण जेवत आहेत. त्यांच्या दिमतीला महागडया गाडयांचा ताफा आहे. हा सर्व खर्च कोण करत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रकाश रेड्डीनी केलेल्या एका व्टिटरवर हा प्रश्न प्रसार माध्यमांना विचारला आहे. त्यांनी याचा शोध घेण्याचा सल्ला दिला आहे.या कमेंटला अनेकांनी मजेशीर उत्तरं दिली आहेत.
https://twitter.com/comradereddy?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Eauthor
आमदार पर्यटनाला गेले आहे. आमदारांनी देश फिरला पाहिजे असे वक्तव्य संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलतांना केले होते.
गमतीचा भाग सोडला तर सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे. याचा खर्च नेमका कोण करत आहे. याचे उत्तर जनतेला मिळणे शक्य नाही. अनेकांनी मोहित कंबोज यांच्याकडे बोट दाखवले आहे. भाजपकडून हा खर्च केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु कोणीतरी माफीया हे करत आहे हे नक्की. हळूहळू नावं जाहिर होतील. तो पर्यंत संयम बाळणे हेच जनतेच्या हातात आहे.
हे सुद्धा वाचा : राजकीय संकट असतानाही उध्दव ठाकरे सरकारने शेतकरी, तरुणांसाठी घेतले स्तुत्य निर्णय
मेरा पानी उतरता देख। ‘मेरे किनारे पर घर मत बसा देना ‘मैं समंदर हूँ ‘। लैटकर वापस आउॅंगा।
शिवसेनेत सतत कारस्थाने करणाऱ्या शंभूराज देसाईंना पक्षाची नोटीस