क्राईम

नाशकात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

नाशकात सार्वजनिक शांततेस छेद देणारी व इंस्टाग्राम वर भावना भडकविणारी (Violators) पोस्ट टाकली म्हणून श्री. संकेत सौदागार यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येऊन कारवाई करण्यात आली . श्री. संकेत सौदागार यांची कृती ही प्रतिक्रिया होती . दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी इंस्टाग्राम वर हिंदू विरोधी चालवल्या जाणाऱ्या पेजवर सीता माते बद्दल अभद्र पोस्ट टाकण्यात आली . सदर पोस्ट एका मुस्लीम मुलाने टाकलेली होती. त्यामुळे भावना दुखावल्या गेल्याने या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून ही धार्मिक पोस्ट टाकण्यात आलेली होती. यावर संवैधानिक मार्ग न अवलंबता दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी पूर्वनियोजित व बेकायदेशीररित्या व जमाव जमा करून उपनगर पोलीस स्टेशन वर दबाव आण्याचा प्रयत्न केला. (Case registered against violators of public peace in Nashik )

तसेच या दबाव तंत्राचा वापर करत नाशिक पुणे रस्ता वाहतूक रात्री बारा ते चार बेकायदेशीर रित्या बंद केला होता. याबाबतीत कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा परवानगी पोलीस स्टेशन कडून न घेता वाहतूक बंद केलेली होती. शांततेचा मार्ग न अवलंबता सरळ सरळ जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची मोडतोड करणे सार्वजनिक वाहनांची तोडफोड करणे, येणाऱ्या जाणाऱ्या हिंदू धर्मीयांना धमक्या देणे, त्यांच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचे दहशत पसरवण्याचे प्रकार रात्री बारा ते चार पर्यंत सर्रास पणे चालू होते, तसेच सदर ठिकाणी पाकिस्तान झिंदाबाद, सर तनसे जुदा अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, जाणीवपूर्वक व पूर्वनियोजित दंगल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला गेला. खाजगी वाहने तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. हिंदू समाजाने प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेत सामाजिक शांतता राखत अशांतता करण्याचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. काल महामानव भारतरत्न डॉकटर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती . त्यामुळे शहरातील वातावरण शांत राहावे आशी भावना होती म्हणून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी झालेला प्रकार बऱ्याच ठिकाणाचे cctv मध्ये आलेला असून सार्वजनिक ठिकाणी दहशद निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे तसेच इंस्टाग्राम वर हिंदू विरोधी चालवल्या जाणाऱ्या पेजवरून सीता माते बद्दल अभद्र पोस्ट टाकणाऱ्या धर्मांध व देशविघातक लोकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक होते परंतु या बाबत कोणतीही कार्यवाही पोलिस प्रशासना कडून करण्यात आलेली नाही.

पोस्ट टाकण्याची घटना दुपारी घडलेली असताना रात्री हजारो लोक उपनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर एकत्र झाले. यापैकी अनेक लोकांकडे शस्त्र देखील होती. अशा प्रकाराने जमाव एकत्र करण्याचे षडयंत्र कोणी केले? यामागे कोणत्या देश विरोधी शक्ती आहेत ? याचाही तपास पोलीस यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे.

काही हिंदू धर्म विरोधकांनी टिपू सुलतान याचे उदातीकरण करणारे बोर्ड सिडको परिसरात जाणीवपूर्वक लावले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असणारी सदर व्यक्ती जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकाराने टिपू सुलतानाचे उदातीकरण करणे संपूर्णतः चुकीचे आहे. या दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

हिंदू समाजाने प्रशासनाला सहकार्य करत सामाजिक शांतता राखलेली आहे.
एक प्रकारे हिंदू समाजाला डीवचण्याचे देखील उद्योग वारंवार होत आहेत लवकरच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर या विधर्मीयाचा सदर निवडणुका लोकशाही मार्गाने न होऊ देणे असा देखील प्रयत्न होत आहे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे की कायदा सुव्यवस्था राखाली गेली पाहिजे. एकाच समाजास प्रशासनाकडून दुखावले गेल्याने असंतोष निर्माण होत आहे. तसेच या सामाज कंटकांविरुद्ध कारवाई न केल्यास त्याचे मनोधैर्य फोफावत जाईल परिणामी कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. हा धोका पोलीस प्रशासनास लक्षात यावा म्हणून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. पोलिसांनी कुठलीही तमा न बाळगता मीरा-भाईंदर प्रमाणे बेकायदेशीर जमाव जमा करणे, सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणे, संघटित गुन्हेगारी कायदा याचे अंतर्गत प्रशासनिक कारवाईचा बडगा उभारावा व कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून हिंदू समजास आश्वस्थ करावे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

16 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

17 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

18 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

22 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

22 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

1 day ago