मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहिले होते. त्यावर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला होता ( Governor Bhagat Sing Koshyri was challenged to government’s decision ) . राज्यपालांच्या या उठाठेवीमुळे विद्यार्थी व पालक हवालदील झाले होते.
विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मंत्री तनपुरे हे पालक – विद्यार्थी – शिक्षक या सर्वच घटकाच्या संपर्कात होते. हे प्रकरण हाताळताना त्यांच्यावर मोठे दडपण होते. स्वतः तनपुरे यांनी तशी माहिती दिली.
मुलांनो,
काल मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि मीच परीक्षा पास झालो की काय अशी feeling मला आली. खरंच लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनचा काळ मला माझ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसारखा वाटला. तेच tension, तीच गडबड, तेच pressure मला जाणवलं.
सतत विविध माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहिलो. कोणी शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते, कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते, अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते, कोणी परीक्षेबाबत पसरलेल्या अफवांना बळी पडत होते… भीती सारखी असली तरी प्रत्येकाच्या मनातील संभ्रम वेगळा होता.
सुवर्णमध्य गाठणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. मानसिकरित्या, आरोग्याच्यादृष्टीने तुम्हाला कसलीच अडचण येऊ नये ही हुरहूर कायम मनात होती. त्यात तुमच्या भविष्याची चिंता अधिक तीव्रतेने जाणवत होती. त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत आम्ही निर्णय घेतला.
आता तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की याने माझे काही मित्र दुखावलेही जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण खरं सांगू का मित्रांनो, या कागदावरच्या परीक्षा होत राहतील, मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात. आता त्याच एका नैसर्गिक आपत्तीच्या परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे पण कठीण नाही. पुढे येणाऱ्या सर्व संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याचा धडा आपल्याला यातून मिळणार आहे. चला तर मग धैर्याने, एकीने आणि सकारात्मकतेने आपण पुढे जाऊयात.
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…